राष्ट्रीय कृषी विकास योजना - महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य (श्री अन्न ) अभियान
या अभियानात कोणत्या बाबी किंवा घटक शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात-
लाभार्थी निवड निकष-
या बाबीचा लाभ शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी/कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांना मिळतो. ३१ मार्च २०२४ पूर्वीची नोंदणी असावी.
एका कुटुंबातील (पती,पत्नी व १८ वर्षांखालील अपत्य) एकाच व्यक्तीस लाभ.
एका गटात २५ शेतकऱ्यांना लाभ
शेतकरी यांची AgriStack वर नोंदणी असणे बंधनकारक.
अजा १२%,अज ९% व सर्वसाधारण लाभार्थी ७९ % निवडण्यात येणार. यामध्ये वनपट्टाधारक शेतकरी व दिव्यांग शेतकरी यांची प्रथम प्राधान्याने निवड. एकूण लाभार्थींपैकी ३०% महिला लाभार्थी असणे आवश्यक.
प्रति शेतकरी ०. ४० हेक्टर चा लाभ.
मागील १० वर्षाच्या आतील अधिसूचित व विद्यापीठाने शिफारस केलेल्या वाणाचे प्रमाणित बियाणे प्रात्यक्षिकासाठी वापरणे आवश्यक.
लाभार्थी यांनी मृदा चाचणी केलेली असावी.
पिक प्रात्यक्षिकां साठी विभागिय स्तरावर कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार जिल्हा/तालुका/पिक निहाय निर्धारित तंत्रज्ञान पैकेज नुसार सर्व घटक अंमलबजावणी साठी हे अनुदान आहे. रासायनिक खतावरिल खर्च लाभार्थी शेतकरी यांनी स्वत: करावयाचा आहे त्यासाठी अनुदान देय नाही.
२. शेतकरी प्रशिक्षण/शेतीशाळा-
ज्या शेतकऱ्यांची पीक प्रात्यक्षिकासाठी निवड झाली आहे त्यांची प्राधान्याने निवड .
३० शेतकरी यांचेसाठी ४ सत्र. रु. ३५००/- प्रति सत्र. याप्रमाणे ४ सत्रासाठी एकूण रु. १४०००/- तरतूद
३. अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण-
२० अधिकारी कर्मचारी यांचे साठी २ दिवसीय प्रशिक्षण. प्रति प्रशिक्षणार्थी प्रति दिन रु. ९०० तरतूद. दोन दिवसासाठी एकूण रु. ३६०००/- तरतूद.
४. जिल्हास्तरावर शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवाद कार्यशाळा-
२५ शेतकरी यांचेसाठी दोन दिवसीय कार्यशाळा. प्रति कार्यशाळा रु. २०००० तरतूद. जिल्ह्यासाठी एकूण दोन कार्यशाळा.
अर्ज कुठे करावा-