Total Pageviews

प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पेन्शन)

प्रधानमंत्री किसान मानधन योजना- 

या योजनेत शेतकरी यांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3000 रु. पेन्शन मिळते.

1. कोण अर्ज करु शकतो- 
18 ते 40 वयोगटातील 2 हेक्टर पर्यंत जमीन असणारे सर्व शेतकरी. 
            
2. अर्ज कुठे करावा- 
आपले सरकार सेवा केंद्रावर. 
योजना ऐच्छिक आहे. 
अर्ज करताना आपले सरकार सेवा केंद्रावर कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.                                                              
3. विमा हप्ता- 
आपल्या वयानुसार रु.55 ते 200 दरमहा विमा हप्ता लागेल. 
आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर विमा हप्ता यामधून थेट कपात होणार व शेतकरी यांना विमा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही. 

4.आवश्यक कागदपत्रे- 
7/12, 8अ, आधार कार्ड, बँक पासबूक प्रत.                                             
5.पेन्शन किती मिळेल-
वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3000 रु.पेन्शन मिळते. पेन्शन सुरु झाल्यानंतर लाभार्थिचा मृत्यू झाल्यास पत्नीस 50 टक्के म्हणजेच रु.1500 दरमहा पेन्शन मिळणार.  
जर  लाभार्थिचा 60 वर्षे वयाआधिच मृत्यू झाल्यास त्यांच्या पत्नी/पतीस ही योजना पुढे सुरु ठेवता येते किंवा योजनेतून बाहेर पडता येते. योजनेतून बाहेर पडल्यानंतर जमा झालेले पैसे व्याजासहित परत मिळनार.                                            प्रधानमंत्री किसान मानधन योजना