सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२५ व रबी हंगाम २०२५-२६ साठी
- खातेदारा व्यतिरीक्त कुळाने अगर भादेपट्टीने शेती करणारे शेतकरी सुद्धा या योजनेत सहभागी होवू शकतात.
- या योजनेत नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी यांना विमा संरक्षण मिळते.
- सदरची योजना ही १२ जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यांमार्फत सन २०२५-२६ या वर्षी कप अँड कॅप मॉडेल (८०:११०) नुसार राबविण्यात येणार आहे
- योजनेत सहभागासाठी शेतकरी ओळख पत्र (AgriStack Farmer ID)असणे अनिवार्य आहे.
- पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई -पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे.
सोयाबीन, कापूस, कांदा.
रबी हंगाम- गहू (बागायत), रबी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग, रबी कांदा.
३. विमा हप्ता किती भरावा लागेल-
खरीप हंगामासाठी २ टक्के,
रबी हंगामासाठी १.५ टक्के
खरीप व रबी हंगामातील नगदी पिकांसाठी- ५टक्के
४.विमा संरक्षणाच्या बाबी -
पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे/तांत्रिक उत्पादन आधारे महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहील.
५. कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती विमा कंपनी-
१. जर जिल्हा समूहामध्ये देय नुकसान भरपाई २०० रु. असेल तर विमा कंपनी १६५ रु. अदा करील व उर्वरित ३५ रु. राज्य शासन अदा करील.
२. जर जिल्हा समूहामध्ये देय नुकसान भरपाई १६० रु. असेल तर विमा कंपनी १६० रु. नुकसान भरपाई अदा करील.
३. जर जिल्हा समूहामध्ये देय नुकसान भरपाई ९५ रु. असेल तर विमा कंपनी ९५ रु. नुकसान भरपाई अदा करील. व उर्वरित ५ रु. स्वतः:कडे ठेवेल.
४. जर जिल्हा समूहामध्ये देय नुकसान भरपाई ५० रु. असेल तर विमा कंपनी ५० रु. नुकसान भरपाई अदा करील. विमा कंपनी २० रु. (एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त २० टक्के म्हणजेच १००x २०%) स्वतः:कडे ठेवेल व उर्वरित ३० रु. राज्य शासनास परत करील.
जर एखाद्या निर्धारीत क्षेत्रातील विमा संरक्षित पिकाचे त्या वर्षीचे दर हेक्टरी सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आले तर त्या क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असे गृहीत धरण्यात येईल.
उंबरठा उत्पादन = हंगामातील मागील ७ वर्षापैकी सर्वोत्तम अशा ५ वर्षाचे सरासरी उत्पादन x ७० टक्के (जोखीम स्तर)
भात सोयाबीन ,कापुस व गहू या पीकांकरीता चालु वर्षाचे सरासरी उत्पादन निश्चित करताना पिक कापणी प्रयोगाद्वारे प्राप्त उत्पादनास ५० टक्के भारांकन व तांत्रिक उत्पादनास ५० टक्के भारांकन देऊन सरासरी उत्पादन निश्चित करण्यात येते.
भात सोयाबीन व कापुस या पीकांकरीता
सरासरी उत्पादन =(पिक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त उत्पादन x ०.५० ) + (तांत्रिक उत्पादन x ०.५० )
उदाहरणार्थ -
पिक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त उत्पादन= १००० किलो / हेक्टर
तंत्रज्ञानावर आधारीत प्राप्त उत्पादन = १५०० किलो/हेक्टर
सरासरी उत्पादन = (१००० x ०.५० ) + (१५०० x ०.५० )= ५०० + ७५० = १२५० किलो/हेक्टर
तंत्रज्ञानावर आधारीत सरासरी उत्पादन निश्चित करताना YES- TECH प्रकल्पाअंतर्गत विमा क्षेत्र घटक स्तरावर प्राप्त होणारी उत्पादनाची आकडेवारी ग्राह्य धरण्यात येईल. सदरची आकडेवारी वेळेत उपलब्ध न झाल्यास पीक कापणी प्रयोगाद्वारे प्राप्त होणारी उत्पादनाची आकडेवारी सरासरी उत्पादन निश्चित करताना ग्राह्य धरण्यात येईल.
सर्व पिकांसाठी नुकसान भरपाई ठरविण्याचे सूत्र =
उंबरठा उत्पादन - चालु वर्षाचे सरासरी उत्पादन
---‐---------------------------------------—------------- x विमा संरक्षित रक्कम(रु. प्रति हे.)
उंबरठा उत्पादन
भाडेपट्टा करार असल्यास करारनामा / सहमतिपत्र.
तसेच www.pmfby.gov.in या वेब साईट वर ऑनलाईन पद्धतीने.
३१ जुलै २०२५
योजनेत सहभागी होण्यासाठी अंतीम तारीख रबी पिकांसाठी कोणती आहे ?
रबी ज्वारी- ३० नोव्हेंबर २०२५
गहू बागायत, हरभरा, कांदा - १५ डिसेंबर २०२५
उन्हाळी भात, उन्हाळी भुईमुग- ३१ मार्च २०२६