राष्ट्रिय अन्नसूरक्षा व पोषण अभियान- अन्नधान्य पिके
राष्ट्रिय अन्नसूरक्षा व पोषण अभियान- अन्नधान्य पिके
हे अभियान कोणत्या पिकांसाठी राबवले जात आहे-
हे अभियान भात, गहू, कडधान्य, भरडधान्य (मका) व पौष्टिक तृणधान्य उपअभियान श्री अन्न, व भात पड क्षेत्रवार कडधान्य उत्पादन वाढविणे (TRFA कडधान्य ) या पिकांसाठी राबविण्यात येत आहे.
हे अभियान राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पिकांसाठी राबवण्यात येत आहे-
सदर अभियान राबवण्यासाठी निधीची उपलब्धता कशा प्रकारे होते-
सदर अभियानासाठी अर्थ सहाय्य केंद्र हिस्सा ६० टक्के व राज्य हिस्सा ४० टक्के असा आहे.
सदर अभियानाचा उद्देश काय आहे-
वरिल पिकांचे क्षेत्र व उत्पादकता वाढावी या उद्देशाने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या अभियानात कोणत्या बाबी किंवा घटक शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात-
पीक प्रात्यक्षिके
प्रमाणित बियाणे वितरण
प्रमाणित बियाणे उत्पादन
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन-सूक्ष्म मूलद्रव्ये, जैविक खते
एकात्मिक कीड व्यवस्थापन-पीक संरक्षण औषधे तणनाशके
फ्लेक्झी फ़ंड -पीक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण, जिल्हा कृषी महोत्सव
या बाबीं साठी शेतकऱ्यांना अनुदान किती मिळते-
१. पीक प्रात्यक्षिकांसाठी मिळणारे अनुदान (रु.)-
लाभार्थी निवड निकष-
या बाबीचा लाभ शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी/कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांना मिळतो. ३१ मार्च २०२४ पूर्वीची नोंदणी असावी.
एका कुटुंबातील (पती,पत्नी व १८ वर्षांखालील अपत्य) एकाच व्यक्तीस लाभ.
एका गटात २५ शेतकऱ्यांना लाभ
शेतकरी यांची AgriStack वर नोंदणी असणे बंधनकारक.
अर्ज mahadbt.maharashtra.gov.in पोर्टल वर करावा .
अजा १२%,अज ९% व सर्वसाधारण लाभार्थी ७९ % निवडण्यात येणार. यामध्ये वनपट्टाधारक शेतकरी व दिव्यांग शेतकरी यांची प्रथम प्राधान्याने निवड. एकूण लाभार्थींपैकी ३०% महिला लाभार्थी असणे आवश्यक.
प्रति शेतकरी ०. ४० हेक्टर चा लाभ.
मागील १० वर्षाच्या आतील अधिसूचित व विद्यापीठाने शिफारस केलेल्या वाणाचे प्रमाणित बियाणे प्रात्यक्षिकासाठी वापरणे आवश्यक.
लाभार्थी यांनी मृदा चाचणी केलेली असावी.
पिक प्रात्यक्षिकां साठी विभागिय स्तरावर कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार जिल्हा/तालुका/पिक निहाय निर्धारित तंत्रज्ञान पैकेज नुसार सर्व घटक अंमलबजावणी साठी हे अनुदान आहे. रासायनिक खतावरिल खर्च लाभार्थी शेतकरी यांनी स्वत: करावयाचा आहे त्यासाठी अनुदान देय नाही.
२. प्रमाणित बियाणे उत्पादन करण्यासाठी अनुदान -
हे अनुदान महाबीज,राष्ट्रीय बीज निगम,NAFED, IFFDC ,कृभको,HIL, NFL , BBSSL या बियाणे क्षेत्रात काम करणाऱ्या केंद्रीय संस्था, ICAR-संस्था/राज्य कृषी विद्यापीठे यांच्या सीड हब यांना देण्यात येते. या बीजोत्पादक संस्थांनी बियाणे उत्पादन कार्यक्रमाची नोंदणी बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे करणे आवश्यक आहे.
मागील ८ वर्षाच्या आतील राज्यासाठी अधिसूचित झालेल्या व शिफारस केलेल्या वाणांचे राज्यातच उत्पादन केलेल्या वाणांसाठी हे अनुदान देण्यात येते. बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडील मुक्तता अहवालाच्या आधारे हे अनुदान देण्यात येते. बियाणे उत्पादकास जास्तीत जास्त ५ हेक्टर पर्यंत अनुदान.
प्रमाणित बियाणे उत्पादनाची नोंद SAATHI पोर्टल वर भरणे आवश्यक.
तूर,मूग,उडीद, हरभरा या कडधान्य पिकांचे प्रमाणित बियाणे उत्पादन करण्यासाठी रु. ५००० प्रती क्विंटल याप्रमाणे अनुदान तर ज्वारी बाजरी नाचणी वरई या पिकांचे प्रमाणित बियाणे उत्पादन करण्यासाठी किमतीच्या ५० टक्के कमाल रु. ३००० प्रति क्विंटल इतके अनुदान देण्यात येते.
बीजोत्पादक संस्थेने बीजोत्पादन कार्यक्रम शेतकऱ्यांच्या शेतावर घेतला असल्यास संस्थेने नोंदणी शुल्क,बियाणे प्रक्रिया इ.साठी २५ टक्के रक्कम स्वतः कडे ठेवावी व उर्वरीत रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न राष्ट्रीयीकृत बँक खात्यावर जमा करावी.
३. प्रमाणित बियाणे वितरण यासाठी अनुदान -
प्रति शेतकरी कमाल १ हेक्टर पर्यंत अनुदान
४. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणेसाठी अनुदान -
यामध्ये सूक्ष्म मुल द्रव्ये, जिप्सम, व जैविक खते या बाबींचा समावेश होतो.
४ अ . सूक्ष्म मुल द्रव्ये वापर करणेसाठी अनुदान -
भात गहू कडधान्य भरडधान्य पौष्टिक तृणधान्य या पिकांसाठी सूक्ष्म मुल द्रव्याच्या वापरासाठी किमतीच्या ५० टक्के किंवा कमाल रु. २५०० प्रती हे. अनुदान देय आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकरी गटाने शिफारशी प्रमाणे सूक्ष्म मुल द्रव्ये खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने खरेदी करावीत व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल. लाभार्थी शेतकरी यांनी कृषी निविष्ठांची खरेदी कैशलेस पद्धतीने अथवा रोखीने करावी. लाभार्थी शेतकरी यांनी वस्तू व सेवा कर क्रमांक असलेली खरेदी पावती सादर करणे बंधनकारक राहिल. तसेच एका लाभार्थी शेतकरी यांना एका वर्षात सर्व बाबी मिळून जास्तित जास्त २ हेक्टर पर्यंत लाभ घेता येइल.
४ब .-जैविक खते वापर करणेसाठी अनुदान -
सदर बाब फक्त कडधान्य (तूर,मूग,उडीद,हरभरा), भरडधान्य(मका) व पौष्टिक तृण धान्य (ज्वारी,बाजरी,नाचणी, वरई ) कार्यक्रमासाठी लागू आहे.
कृषी विभागाच्या जैविक प्रयोगशाळे मार्फत पिक गटास आवश्यक द्रवरुप जैविक खते/जैविक खते संघ (liquid consortia) तयार करण्यात येत असुन सदर खतांची बीज प्रक्रिया केल्यास उत्पादन खर्चात बचत करुन पिकांच्या उत्पादकतेत वाढ होते.
द्रवरुप जीवाणू संघ (liquid consertia) यामध्ये नत्र स्थिरी करण करणारे, स्फूरद विरघळविणारे व जस्त विरघळविणारे जीवाणू उपलब्ध करुन देणारे यापैकी कमीत कमी दोन किंवा अधिक जिवाणुंचा समावेश असतो.
लाभार्थी शेतकरी यांनी जैविक खतांची खरेदी प्रथम प्राधान्याने शासकीय संस्था/प्रयोग शाळा, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र यांच्या कडून करावी.व तेथे उपलब्ध न झाल्यास खुल्या बाजारातून करावी.
यासाठी किमतीच्या ५० टक्के किंवा कमाल रु.२५०० प्रती हेक्टर अनुदान देय आहे.
शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.
५ .एकात्मिक किड/रोग व्यवस्थापन करणेसाठी अनुदान -
५ अ . किडनाशके खरेदीसाठी अनुदान -
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान -अन्नधान्य पिके अंतर्गत सर्व पिकांसाठी हे अनुदान देय आहे. यासाठी ५० टक्के, कमाल रु.२५००प्रती हेक्टर अनुदान देय आहे. लाभार्थी शेतकरी गटाने कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने लेबल क्लेम असलेल्या पीक संरक्षण औषधांची खरेदी करावी व त्यानंतर शेतकऱ्यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येते . प्रति शेतकरी एका हंगामात जास्तीत जास्त २ हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय आहे.
५ ब . तण नाशके खरेदीसाठी अनुदान -
भात गहू कडधान्य भरडधान्य पौष्टिक तृणधान्य या पिकांसाठी तण नाशकाच्या वापरासाठी किमतीच्या ५० टक्के , कमाल रु.२५०० प्रती हे. अनुदान देय आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकरी यांनी खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने लेबल क्लेम असलेल्या तण नाशकांची खरेदी करावी व त्यानंतर शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियिकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.
६ .फ्लेक्झी घटक-
६.१- पीक पद्धतीवर आधारीत शेतकरी प्रशिक्षण-
ज्या शेतकऱ्यांची पीक प्रात्यक्षिकासाठी निवड झाली आहे त्यांना प्राधान्याने प्रशिक्षण देण्यात येणार. आत्मा योजनेच्या नियमानुसार प्रति शेतकरी प्रति दिन २५० रु. तरतूद. एका प्रशिक्षणासाठी ३० शेतकरी. याप्रमाणे प्रति प्रशिक्षण ७५०० रु. असे ४ प्रशिक्षण यासाठी रु. ३०००० तरतूद आहे.
६.२- जिल्हा कृषी महोत्सव-
जिल्हा कृषी महोत्सव किमान २ दिवसांचा असावा. यामध्ये कृषी प्रदर्शन, परिसंवाद चर्चासत्रे, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री/धान्य महोत्सव या बाबींचा समावेश असावा. यासाठी आत्मा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रु. ६ लाख प्रति जिल्हा इतकी तरतूद आहे.
७. प्रकल्प व्यवस्थापन चमू-
जिल्हा स्तरावर १ तंत्र सल्लागार- (कृषी विद्यावेत्ता, कृषी विस्तार, मृद शास्त्र, पीक संरक्षण, वनस्पती पैदासशास्त्र, पीक सुधारणा या विषयातील पदव्युत्तर पदवी व कमीत कमी १० वर्षांचा क्षेत्रीय कामाचा अनुभव. व जिल्हास्तरावर २ तंत्र सहाय्यक- (कृषी विषयातील पदवी व क्षेत्रीय स्तरावरील पीक व्यवस्थापन क्षेत्रातील प्राविण्य तसेच संगणकीय ज्ञान आवश्यक)
योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर समिती -
मा. जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हे सदस्य सचिव.
अर्ज कुठे करावा-