Total Pageviews

रेशिम उद्योग (पोकरा अंतर्गत)

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत- रेशीम उद्योग- 

अ) योजनेत कोण सहभागी होऊ शकतात -

 ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी.                                                

ब) अर्थसहाय्य किती मिळते- 

सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना खर्चाच्या 75 टक्के व  अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती करिता 90 टक्के अर्थ सहाय्य देय आहे. 
एका कुटुंबातील एकाच व्यक्तिस या योजनेचा लाभ देण्यात येइल. 
देय अनुदान थेट लाभार्थ्याच्या   आधार संलग्न बँक खात्यात  जमा करण्यात येते.                                   

क) खर्चाचा मापदंड - 

तूती रोपे तयार करणे,लागवड, कीटक संगोपन साहित्य, 1000 चौ.फूट किटक संगोपन गृह बांधणे यासाठी रु.443639 इतका खर्चाचा माप दंड आहे. 500 चौ.फुट कीटक संगोपन गृह बांधल्यास वरिल सर्व बाबीं साठी मिळून 370197 रु.असा खर्चाचा माप दंड आहे. 

याच्या 75 टक्के व 90 टक्के अनुदान देण्यात येते. तसेच तूती रोपांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत  ठिबक सिंचन बाबीचा लाभ देय आहे. 

लाभार्थ्याने  सदरचा व्यवसाय किमान 3 वर्ष करणे आवश्यक आहे.                                                             

ड ) अर्ज कुठे करावा -
इच्छुक शेतकऱ्यांनी  https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.      

इ) खरेदी कोठून करावी-  

लाभार्थी ने पुर्व संमती मिलाल्यापासून तूती लागवड प्रकल्प उभारणी करुन 60 दिवसात ऑनलाईन अनुदान मागणी करावी. तूती लागवडीचा कालावधी जून ते ऑक्टोबर असा आहे. खरेदी समितीच्या उपस्थितीत रेशीम उद्योगासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करावी. खरेदीसमिती चे अध्यक्ष  हे सरपंच असतात. उपसरपंच, ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्यां पैकी 1 महिला सदस्य, कृषी मित्र/कृषी ताई, रेशीम संचालनालयाचा तालुका स्तरावरील प्रतिनिधी  हे सदस्य असतात. तर कृषी सहाय्यक हे सचिव असतात.